लेख क्र. १ आज काल चे प्रेम
आज काल लोक फक्त पैशावर प्रेम करतात, भले मग तो मुलगा असो वा मुलगी. श्रीमंत मुलगा
किंवा मुलगी दिसली की मुलं तिच्या मागे-मागे करता किंवा त्या मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात आडकवणे आणि
तिचा विश्वास जिंकून घेणे जेणे करून दुसऱ्याने तिला खर जरी सांगितलं तरी ते तिला खोटाच वाटल पाहिजे आणि मग
हळ-ूहळू करून तिच्या पैशांवर थोडा-थोडा हात साफ करणे. अस फक्त मुलाच करता अस नाही हे मुली पण करता.
आज कालचे प्रेम हे पैशांनबरोबर शारीरिक आकर्षणावर पण आहे. ह्या गोष्टीत सर्वस्व
मुलांचा हात असतो. एखादया मुलीवर प्रेम करणे, तिच्यावर खर्च करणे, तिचा विश्वास जिंकणे, खोट्या प्रेमाचे
नाटक करणे, फक्त शारीरिक सुखाची अस करणे, हे प्रेम फक्त शारीरिक सुख मिळे पर्यंत राहत. त्या नंतर त्या नंतर
मुलाची शारीरिक सुखाची आस संपते आणि त्या नंतर हे खोटे प्रेम उघड होते आणि हो, शारीरिक सुखासाठी केलेले
प्रेम हे फक्त ठराविक वेळे पुरते मर्यादित असते. जेवढ्या प्रमाणात मुले ह्या सर्वाला कारणीभूत आहे, तितक्याच
प्रमाणात मुली सुद्धा या सर्वाला कारणीभूत आहे. जर एखाद्या मुलीने या सर्वाला नकार दिला, तर मुलाची काय
हिंमतच होणार
नाही ना...हे सर्व करण्याची. आशा ठिकाणी मुले जेवढ्या प्रमाणात चुकतात त्या ठिकाणी मुलीही तेवढ्याच प्रमाणात
जिंमेदार आहे.
आता सध्या ह्यांचे वेगळेच चाळे चालू असतात. Break-up/patch-up जर तुम्ही एखादी
मुलगा/मुलगी बरोबर नाही राहू शकत नाही ना...तर काय? त्याच्या तिच्या आयुष्याच्या नाश करता. एखाद्याने
तुम्हाला सोडलं तर, यांचे एक वेगळेच थेर चालतात, उदा. हाताची नस कापून घेणे, विष घेणे, हाता पाय वर ब्लेड
मारणे. तुम्हाला याच्या साठी जन्म दिला का? तुमच्या आई वडिलांनी. की एखाद्या मुलीवर प्रेम कर अन, ती नाही
म्हणाली की, हाताची नस कापून घे, हे कर ते कर, तुला ह्यायचा आहे ना स्वतःचा जीव तर...एक काम कर दोरी घे,
पांख्यावर टाक आणि लटक...अरे लाज वाटली पाहिजे. आपल्या आई वडीलांनी आपल्याला कशासाठी जन्म दिला ते, जसे ते
तुला तुझ्या लहान पणात तुझा आधार बनले बनले, तसा तू त्यांच्या म्हातारं पणात तुम्ही त्यांची काठी व्हा,
त्यांना आधार द्या, त्यांचा आधार बना. बरं हे सर्व करून म्हणजे हात-पाय वर ब्लेड ने वर करणे, या सर्वांचा
ताण तुमच्या आई वडीलांच होणार आहे ना...जर तुम्ही त्यांना आनंदी नाही ठेवू शकत, तर त्यांना त्रास/ताण का देत
हे सर्व करून. जीवनात धोका मिळाल्याने अनेक जण आपले आयुष संपवून घेतात. तर काही या सर्वातून आपल्या
आयुष्याची नवीन सर्वात करता आणि अश्या ठिकाणी जाऊन पोहचतात की ज्या ठिकाणी त्यांना त्याच मुलीचे वडील स्वतः
येऊन त्या मुलीचा हात त्या मुलाच्या हातात देतात.आणि या सर्वातून जो सावरेल तोच आपल्या जीवनात काही करून
दाखवण्याची हिम्मत करतो, तो खरा माणूस आणि अश्याच गोष्टीतून हिम्मत दाखवुन जो वाईट मार्ग न बघता चांगल्या
मार्गाने वर चालतो आणि हो जो वेक्ती प्रेमात धोखा खातो, त्याला अस कोणतीच दुःख नाही की त्यात आता परत हताश
किंवा निराश करू शकेल. त्यांच्या कौटुंबिक वेक्ति वगळता. ह्या जगात खूप लोक आहे, ज्यांना प्रेमात धोका खाऊन
आणि मग एक उंच शिखरावर जाऊन बसले आहे.
प्रेम करा, पण अस करा की ते खर असल पाहिजे. मी अस नाही म्हणत की सर्वच जण शारीरिक
आकर्षणा वर किंवा पैशा वर प्रेम करतात. हे खर प्रेम करतात आणि मरे पर्यंत एका वेक्ती वर प्रेम करता. तेव्हा
त्याला खर प्रेम म्हणत. पण अस नाही की तुम्ही आता प्रेमाची आस सोडून द्यायची, म्हणण्याचा उदेश फक्त एवढाच की
ज्या वर प्रेम कराल त्याच्याशी एक निष्ट रहा आणि हो, जेव्हाही प्रेम कराल त्या वेळेस आणि जेव्हा ही ब्रेक-अप
झाल्यावर त्या मुलीची किंवा त्या मुलाची बदनामी करू नका. ती मुलगी जेव्हा तुमच्या आयुष्यात होती तेव्हा
तुम्हाला चांगली वाटत होती आणि ती नाही काय म्हंटली ती लगेच वाईट झाली. आपण जेव्हा खर प्रेम करतो ना, तेव्हा
आपल्याला कळते की खऱ्या प्रेमात किती ताकद असते आणि आपण जे केलं त्यात आपल्याला कुठ तरी समाधान मिळत. अस
म्हणता की खऱ्या प्रेमाचा शेवट हा वाईट होतो. पण, जर आपण प्रेम करू शकतो तर त्या प्रेमाला आपल्याला सिद्ध
करण्याची ताकद आपल्यात असली पाहिजे. जर या सर्वांना मुलीच्या घरच्यांचा नकार असेल तर, आपल्याला आपल प्रेम
सिद्ध करता आल पाहिजे. की आमचे प्रेम खरे आहे. काही जण म्हणतील की प्रेमाला सिद्ध करायची गरज नसते. पण,
जेव्हा ते घरच्यांन समोर येत ना....तेव्हा त्याला सिद्धच करावं लागत. या सर्वाला नकार देण्यात मुलीच्या
वडिलांचा हात असतो. कारण मुलीच्या वडिलांना असं वाटत असत की, मी सांभाळलेल्या रक्ताच्या गोळ्याला कास देऊ मी
कोण परक्याच्या हातात देऊ. मी याला ओळखत नाही. पण आपल्याला ते सिद्ध करत आले पाहिजे. की, आपण त्यांच्या
मुलीला तेवढेच प्रेम देऊ शकतो. पण, मुलीच्या वडिलांन इतके प्रेम करणारा कोंहीच नाही. कारण या जगात आई बापा
पेक्षा जास्त प्रेम कोणीच नाही करू शकत.
आपण पण त्यांच्या मुलीचा सांभाळ करू शकतो. आपण त्यांच्या मुलीला कसे खुश ठेवू शकतो. या
जगात अशे अनेक उदा. आहे, की ज्यांनी खर प्रेम केले होते. या जगात सर्वात प्रसिद्ध प्रेमावर आधारित नात्याकथा
म्हणजे रोमिओ जुलियेट यांची आहे. ही एक शोकांतिका नाट्य कथा आहे. विलियम शेक्सपिअर यांनी लिहिलेली नाट्य कथा
आहे. खऱ्या प्रेमाचा शेवट/अंत हा दुःखत होतो अस ऐकल आहे, पण खऱ्या प्रेमात जी ताकद असते ना, ती म्हणजे
अतुलनीय आहे. जर दोन्ही बाजूने खर प्रेम असेल ना.. तर ते तोडन कदाचितच अशक्य आहे.
आज काल ३०-४०% अंतर जातीय विवाह होतात. या सर्वात मोठा वाटा खऱ्या प्रेमाचा आहे. प्रेम जर दोन्ही बाजूने खर
असेल ना..एक तर त्याचा शेवट मांडवात होतो किंवा स्मशानात. आधी ही खरे प्रेम होत होते, पण त्याला कुठेच
मान्यता नव्हती, पण आता त्याला बऱ्याच प्रमाणत त्याला मान्यता आहे.
आपल्याला प्रेम करायचं अधिकार आहे, तर खर प्रेम करा ना....असे फसवे, शारीरिक आकर्षणा वर केलेले प्रेम काय
कामाचे?
हिंदीत दोन ओळी आहे. ज्या आपल्याला खऱ्या प्रेमाची संपूर्ण
व्याख्या सांगून जाते.
चहरे से सुरू होई मोहब्बत कूछ पल की होती है| पर रुह से की होई मोहब्बत मरते दम तक होती है|